“लिंगायत धर्म हा नकारात्मक नसून क्रियाशील ,सकारात्मक आहे. त्यांचा
एकेश्वरवाद, गुरु, लिंग, जंगमांची कल्पना व कायक भावनाच त्यांच्या निदर्शक आहेत.”
-
डॉ.हीरेमल्लुर
ईश्वरन (समाजशास्त्र )
“वीरशैव हा शब्द
वचनांच्या काळात म्हणजे बाराव्या शतकामध्ये कर्नाटकच नव्हे तर आंध्रप्रदेशाच्याही
कोणत्याही काव्य, शास्त्र, शिलालेखमध्ये आलेला दिसत नाही. तो शब्द शरण
चळवळी नंतर अस्तित्वात आला आहे. त्यामुळे लिंगायत हा
शब्दच मूळ मानावा लागेल.”
-
डॉ.एम.एम.कलबुर्गी
(माजी कुलगुरु, कन्नड़ विद्यापीठ, हंपी)
“दिन दलितांच्या
उद्धारासाठी उदयाला आलेला व सर्व योगांचा सुंदर समन्वय साधलेला लिंगायत धर्म स्वर्ग-मर्त्य
, इह-पर, भौतिक-पारमार्थिक, लोकायत-अध्यात्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आला आहे. तो एक जीवनमार्गच नव्हे तर सामाजिक धर्मही आहे.”
-
डॉ.दे.जवरेगौड़ा
(माजी कुलगुरु, म्हैसूर विश्वविद्यालय, म्हैसूर)
“लिंगायत धर्म
कर्मठपनाच्या यज्ञ-यागादी संस्कारान्ना मुळीच महत्व न देता, वैचारिकता व्
नैतिक परीशुद्धता यांना अधिक महत्व दिल्यामुळे आज विश्वधर्माच्या
मालिकेत जाऊन बसला आहे. पुरोहितशाही विरुद्ध दंड
थोपटुन उभा राहिलेला हा धर्म असून भक्त व् भगवंत यांच्यामधे पुरोहितांची दलाली नको
असे तो घंटाघोष करून सांगतो.”
-
डॉ.ए.एल.शिवरूद्रप्पा
(संपादक, प्रसाद मासिक
कर्नाटक)
“स्त्री शुद्रांना
धार्मिक अधिकार नाकारनार्या आणि पशुपति हत्या, यज्ञयाग, जातीभेदाचे
समर्थन करनार्या हिंदु धर्माला बसवेश्वरानी नाकारले. त्या
बसवेश्वरांच्या लिंगायत धर्माची मानवतावाद ही समाजाला फार मोठी देणगी आहे.”
-
डॉ.एन.जी.महादेवप्प
(कर्नाटक विद्यापीठ, धारवाड़)
“बसवेश्वरांसह
शिवशरनांनी निर्माण केलेला 'लिंगायत' हा एक परिपूर्ण सिद्धांत आहे. अंग-लिंगमुखी, समान समाजमुखी, समृद्ध समाजमुखी असे हे चतुर्मुखी सिद्धांत
आहेत.”
-
सिद्धराम
स्वामीजी (नागनुर रुद्रक्षी मठ, बेळगाव)
संकलन - सचिन पि.घुसे ( कळमनुरी, जि. हिंगोली )
संपर्क
- 9604225322
khup chan appa
ReplyDeletekhup chan appa
ReplyDeleteशरनु शरणार्थी आप्पा खुप छान
ReplyDeleteमस्त लय भरी
ReplyDeleteमस्त लय भरी
ReplyDeleteभाऊ बसव मंच ग्रुप जेवळी र्तफे धन्यवाद महीती आमुल्य आहे
ReplyDeleteभाऊ बसव मंच ग्रुप जेवळी र्तफे धन्यवाद महीती आमुल्य आहे
ReplyDelete