ANUBHAVA MANTAPA

ANUBHAVA MANTAPA

Wednesday, December 10, 2014

एकाच देवावर विश्वास ठेवा

"एकाच देवावर विश्वास ठेवा!"

(बसवण्णांची एक छान कहानी नक्की वाचा.)

      बसवण्णां बालवयापासूनच हूशार होते. बसवण्णां सात वर्षाचे झाले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. बागेवाडीतील गुरूगृही गेलेला बसव सूर्य डोक्यावर आला तरी परतला नव्हता. मादिराजाने घरगड्याला पाठविले. बसव आला तो धापा टाकीतच. घशाला कोरड पडली होती .त्याने आईला मोठ्याने ओरडून पाणी मागितले. आई तसेच बाबा देवपूजेत निमग्न होते. आई म्हणाली, " थांब हं थोडा वेळ ,मी सोवळ्याने देवपूजा करीत आहे. पूजा आटोपल्यावर पाणी देते." पुजागृहात प्रत्येक देव-देवतेची यथासांग षोडषोपचारे पूजा चाललेली होती.ती पाहून त्याला राग आलेला होता.बसवाला तहानेने धीर धरवत नव्हता. दाणदाण पावले टाकित परसदारीच्या अंगणात जाऊन खुरप्याने खडे खोदू लागला. दोन वीत खडा खोदल्यावर दुसरा खोदू लागे, तसाच तिसरा, चौथा असे करत करत १०-१२ खडे खोदून झालेले होते. तेवढ्यात ताम्हणातील पूजेचे पाणी व निर्माल्य विसर्जनासाठी मंदिराज बाहेर आले. मार्गात खोदलेले खडे पाहून म्हणाले - " "अरे बसवा, हे १०-१२ खडे कशासाठी ?"
बसव:- "मला तहान लागलेली आहे ना, पाणी मिळवण्यासाठी खोद्तोय. विहिरीत नाही का पाणी जमा होत?"
मादिराज:- "अरे, मग एकच नाही का खोदायचा? तोच खूप असेल तेव्हाच झरे लागतील ना ,तू १० नाही , २०-३० खडे खोदले तरीही झरे काही तुला प्रसन्न
होणार नाहीत."
बसव:- "अहो बाबा,देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही नाही का गणेश, शिवलिंग, नंदी , विष्णू, अग्नी, सूर्यनारायण , नवगृह  लक्ष्मी अशा अनेक देवदेवतांची पूजा करीत? तुम्हाला वाटते कोणता तरी देव प्रसन्न होइलच. म्हणून या ना त्या खड्यात कुठेतरी पाणी लागेलच ह्या उदेशाने मी एवढे खडे खोदले. परंतु एकाही खड्यात पाणी लागले
नाही . मग तहान कशी भागणार ?"

      मादिराज त्या सात वर्षाच्या पुत्राकडे, त्याच्या चुरचुरीत बोलण्याकडे 'आ' वासून एकटक पाहतच राहीले.

- इंजि. कैलाश पाटिल.
( प्रदेश संघटक, लिंगायत सेवा संघ )

Tuesday, December 9, 2014

बसवन्ना

शोषित आणि वंचितांना समाजाच्या प्रवाहात आणणारा दलितोद्धारक !
परंपरांच्या जोखडातुन आणि दास्यत्वातुन माझ्या माय माऊल्यांना मुक्त करणारा स्त्रिउद्धारक !
समतेची पताका जगाच्या पाठीवर गाजवनारा युगप्रवर्तक !
न्याय्यहक्कांसाठी गणाचाराचा वापर करण्यास सांगणारा क्रांतिवीर !
ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून जग गाजवनारा जगतज्योती !
स्पृश्यअस्प्रुश्यांना एका छत्राखाली आणनारा समतानायक !
मानवतेच्या शिखरावरचा परमोच्च बिंदु असलेला महामानव महात्मा !
परंपरेच्या ठोसरा खात जीवन जगणार्यांना प्रगतीचा मार्ग दाखवनारा मुक्तिदाता !
स्वर्ग-नरक या खोट्या मोहजालातुन वास्तव दुनियेत घेवुन येणारा जीवनदाता !
जगातील पहिल्या लोकशाही दालनाचा निर्मिक अनुभव मंटप जनक !

      असल्या शेकडो बिरुदावल्या संपतील पण त्या सर्वांना पुरून उरेल असे एकच नाव म्हणजे माझा बाप अप्प बसवन्ना !

      सार्थ अभिमान असू द्यात की लिंगायत नावाच्या लोकशाहीवादी धर्माचे तुम्ही आणि मी उपासक आहोत ! अभिमान असू द्यात की त्या बसवन्नाचे अनुयायी आहोत ज्याने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय असल्या सर्व क्षेत्रांत आद्यस्थान गाजवलय ! फ़क्त त्याचा खरा ईतिहास तुम्हाला आणि मला जगासमोर आणायचा आहे ! हे एकमात्र काम जर आपण पूर्ण करू शकलोत तर बसवन्नाचे ऋण फेडल्यासारखे होईल !

गर्वाने म्हणा , जय गुरु बसवेश ! हर हर महादेव !!

- अविनाश यशके ( संपर्क- 8149760150 )

Monday, December 8, 2014

माझा बाप बसवन्ना

माझा बाप बसवन्ना

माझा बाप बसवन्ना,
दिन दुबल्यांचा कैवारी ।
स्थापिला लिंगायत धर्म,
दिली सर्वांना भरारी ।।

धर्म सांगे वंचितांना ,
धर्म सांगे शोषितांना ।
सांगे दुर्बलांना शिवगोष्टि ,
त्यांचे सुख दुःख वारी ।।

ईष्टलिंगाचा जनक ,
अनुभव मंटप संस्थापक ।
लोकशाहीरूपी धर्म देवून ,
पुऱ्या जगताला उद्धारी ।।

माझा बाप बसवन्ना ,
सांगतो मंत्र कायकाचा ।
दावितो मार्ग सत्याचा ,
मानव जातीला तारी ।।

- अविनाश यशके आणि सचिन घुसे
(शेवटची ओळ सुचवन्यास मला माझे मित्र सचिन घुसे यांनी मदत केलि मी त्यांचा आभारी आहे.)

क्रांतिगीत

क्रांतिगीत

      जातीयवादाच्या आणि वैदिक संस्कृतीत गुरफटलेल्या माझ्या बांधवांसाठी ही चळवळीत सामिल होण्यासाठी माझी आर्त हाक ! 

जूंपलेस आम्हाला अंधश्रद्धांच्या जोखडात ,
ओढलेस फटकार पाठीवरी आमुच्या ,
तरी राहिलो गप्प अगणित वर्षांपासून ,
तरी राहिलो निद्र अगणित वर्षांपासून ।

पण आज उठू दे आम्हाला ,
रणशिंग फुंकू दे आम्हाला ,
आप्त स्वकियांची ताक़त ,
अरे आज कलु दे आम्हाला ।

का बांधतोस तू आप्तांन्ना ,
त्या संघ वगैरे खोडाला ,
का चेतवितोस तू भ्याडासारखा,
जाती दंगली , त्वेशांना ।

अरे शोध तुझा ईतिहास खरा ,
बाप खरा अन तुझा धर्म खरा ।
अरे सामिल हो चल आम्हाला ,
या नव्या युगाच्या नाऱ्याला ।

- अविनाश दिलिपआप्पा यशके, पूर्णा
(८१४९७६०१५०)

वचन मन्मथस्वामींचे

वचन मन्मथस्वामींचे

"नारी नरा सकळीका । येथे अधिकार असे देखा ।।
तेथे वर्णाश्रमाचा उपखा । काढू नये पै ।।"

      संत शिरोमणी मन्मथ माऊलि परमरहस्याच्या अकराव्या अध्यायातिल १४४ व्या ओवी मध्ये सांगतात , 'माझ्या लिंगायत धर्मात स्त्री पुरुषत्वाची सगळी बंधने खोडून , सर्वांना समान अधिकार दिले आहेत. म्हणून कुणी वर्णाश्रम (चातुर्वर्ण) वगैरे च्या गोष्टी आम्हा लिंगायतांना सांगन्याच्या नादी न लागलेलेच बरे.'

जगातला उत्कृष्ट संघटक माझा अप्प बसवन्ना

जगातला उत्कृष्ट संघटक माझा अप्प बसवन्ना

मित्रांनो शरणु शरणार्थी ,
      आज संघटन म्हणजे काय हे आपल्याला वेगळ सांगन्याची गरज ऊरली नाही. कुणी एक नेता असतो मागे चार-पाच कार्यकर्ते असतात , आणि राष्ट्रिय कार्यकारिणी त्यांच्यात वाटुन दिलेली असते . ( अपवाद असतात भरपूर पण उल्लेख जागे अभावी करणार नाही ) . पण आज पासून जवळपास 900 वर्षांपूर्वी माझ्या अप्प बसवन्नाने एक असे संघटन करून दाखवले ज्याची न भूतो न भविष्यति अशीच गणना केलि जाईल. थोडक्यात बांधनी मांडतोय , -

१) अनुभव मंटप - लिंगायत धर्मासाठी कायदे बनवनारी संघटना , बसवन्ना याचे संस्थापक अध्यक्ष .

२) शून्य पीठाधीश (अनुभव मंटप अध्यक्ष )- अप्प बसवन्नाच्या संघटनेच एक वैशिष्ट्य. अप्प बसवन्नानी धर्मप्रमुखाच काम ज्ञ्यानाच्या तत्वावर ठेवले . बसवन्नाच्या अनुभव मंटपाला अनुक्रमे अल्लमप्रभुदेव , सिद्धरामन्ना , चन्नबसवन्ना आणि रूद्रमुनी या चार व्यक्तींनी नेतृत्व दिलेल आहे. ह्यांच्या परवानगी नेच लिंगायत धर्माचे कायदे बनले आहेत.

३) शरण (अनुभव मंटप सदस्य) - जर अनुभव मंटपाला आजचे लोकशाही दालन म्हटले तर शरण म्हणजे लोकप्रतिनिधि , शरनांनी वचन रुपात कायदे पारित करण्यासाठी मांडले आणि अनुभव मंटपाद्वारे चर्चेतून ते पारित केल्या गेले. शरण पदापर्यंत पोहोचण्यासाठी अंगी धर्माविषयी तळमळ , चिकित्सक अभ्यासू वृत्ति आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कायक आवश्यक होता . जवळपास 350 जातींचे आणि 10% स्त्रियांचा सहभाग (आरक्षण लागु नसताना पण ) असलेले 770 शरण अनुभव मंटपाला लाभले होते .

४) जंगम (धर्मप्रचारक ) - अनुभव मंटपाद्वारे तय्यार केल्या गेलेल्या कायदेरूपी वचनांचा प्रचार , प्रसार आणि अंमलबजावनी करुण घेण्याच सर्वात मोठ दायित्व उचलनारे पूर्णवेळ कार्यकर्ते . अनुभव मंटपाला लाभलेल्या एकूण प्रचारकांची संख्या 196000 असल्याचे साहित्यात आढळते.

५) लिंगायत ( बसवन्नाच्या संघटनेचा पाईक ) - तुम्ही मी आपण सर्व आज बसवन्नाच्या, अनुभव मंटपाच्या घालून दिलेल्या नियमांवर चालत आलेल्या खुप मोठ्या संघटनेचे वारसदार आहोत .

      आज भाषेच्या कारणामुले आणि परकीय मनुवाद्यांमुले संघटनेत पुष्कळ बदल घडले असतील पण स्वतःचा ईतिहास वाचून आपण खरे लिंगायत बनू शकतोत . शेवटी लिंगायत हा आचरण धर्म आहे . जंगम, शरण, अनुभव मंटप आणि बसवन्नाच्या तत्वावर चालणार्याच सर्वोत्कृष्ट संघटन आहे. असा माझा अप्प बसवन्ना आणि त्याच्या धर्मातील आज अस्तित्वात असलेल्या प्रत्येक संघटनेने एकत्रित येवून समाजासाठी , अस्तित्वासाठी एकत्र येवून बसवन्नासारख्या संघटकाचे वारसदार असल्याचे जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे . म्हणून माझ्या तमाम लिंगायत बांधवांनो आपला जाज्वल्य ईतिहास डोळ्यासमोर ठेवून लिंगायत या एका नावाखाली संघटित व्हा ! मला माहिती नाही की आज धर्ममान्यता परत मिळवन्यासाठी सर्व जन , सर्व संघटन एकत्र कसे होतिल पण एक लिंगायत या नात्याने सर्वसामान्य लिंगायताची पण हीच भावना आहे आणि हेच स्वप्न आहे एवढे मी सांगू शकतो . माझ्या 6 कोटि लिंगायतांच्या भावनांचा विचार करुण सर्व संघटनांनी एकत्र येण्याची योजना आखावी . संघटनेच्या नावाखातर नव्हे तर समाजाच्या अस्तित्वाखातर लढाव एवढीच रास्त अपेक्षा .

- अविनाश यशके
( संपर्क क्र.-8149760150 )

( ह्या विचारांना फेसबुक वर मत , प्रतिक्रिया देण्यासाठी visit करा -
https://m.facebook.com/photo.php?fbid=737217073038580&id=100002508833029&set=gm.752091684869863&refid=18&_ft_&__tn__=E )