ANUBHAVA MANTAPA

ANUBHAVA MANTAPA

Tuesday, May 26, 2015

"आता लिंगायतांनी जागरूक झाले पाहिजे" - अनंत पाटिल

शरणु शरणार्थी,

      आता लिंगायतांनी जागरूक झाले पाहिजे महात्मा बसवण्णाचे नाव घेऊन जगायचे असेल तर लढ़ा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे ..!

      नवरा मेलेल्या विधवेसारखी आमची परिस्थिति झाली आहे. ज्यांच्यावर लिंगायत तत्वांच्या प्रचार नि प्रसाराची जबाबदारी टाकली होती तेच लिंगायत तत्वांपासुन पळ काढत आहेत आणि एकदा कपाळ गुंजलेले असल्यामुळे दूसर कुणी हातही धरायला तयार नाही अशी रडकी व्यथा आमच्या समाजाची झाली आहे ..!

      त्यामुळे लिंगायत समाजात एक दुर्दैवी बाबा आहे असे म्हणावे लागेल समाजाचा अर्थिक, सामाजिक, सांस्कृतीक विकास खुंटला आहे म्हणुन आपल्याला लिंगायत तत्व आचरणात आणुन त्याचा प्रचार नि प्रसार करण्या शिवाय आपल्या पुढे पर्याय नाही ..!
     
      आता आपल्याला रडून चालणार नाही तर लढावे लागेल संघटित पणे घाव घालावा लागेल .! परिवर्तनाच्या लढाईत सामिल व्हावे लागेल कारण विजय हा नेहमी संघर्षाने मिळतो, म्हणून संघर्ष करावा लागेल .!

जय लिंगायत, जय बसवण्णा .!

- मा. अनंत पाटिल,
संपर्क - 9096416141
(शहर अध्यक्ष - बसव ब्रिगेड, मुरूम)